Posts

मातंग संघटनांचा सतरा कलमी कृती कार्यक्रम

 छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे ठरला मातंग समाजाचा 17 कलमी कृती कार्यक्रम  ....................................................................................महाराष्ट्रातील मातंग संघटना प्रमुखांची दिनांक 5 जून 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सुभेदारी विश्रामगृहाच्या भव्यदिव्य स्वागत कक्षात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे जिल्हाध्यक्ष तथा मातंग क्रांती मोर्चाचे संयोजक संजयभाऊ ठोकळ हे होते. या बैठकीत मुंबई, पुणे, नाशिक, नगर,  लातूर, नांदेड, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, नागपूर, परभणी, हिंगोली, वाशिम, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) आदी जिल्ह्यातून संघटना प्रमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली: 1. आरक्षण वर्गीकरण होणार असलं तरी मातंग दलितांचं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, शिकल्यानंतर त्या प्रत्येक मुलाला संधी मिळाली पाहिजे यासाठी सामाजिक न्यायाचा लढा वृद्धिंगत केला पाहिजे. 2. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. 3. अनुसूचित जात...

बाबासाहेबांचे वारसदारः आंबेडकर कि गवई?

Image
बाबासाहेबांचे वारसदारः आंबेडकर कि गवई? बाबासाहेबांच्या घराण्यात जन्मलेला जसा त्यांचा वारसदार ठरतो तदवतच बाबासाहेबांचा विचार जगणारा हा देखील त्यांचा खराखुरा वारसदार ठरतो. आंबेडकर आडनाव असलेल्या वारसदारांच्या यादीत कदाचित गवई हे नाव नसले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या आंबेडकरवाद्यांच्या यादीत मात्र जस्टीस बी आर गवई यांचे नाव कोरले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी 'दि स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदरसिंग' अपिलात आरक्षण वर्गीकरणासंदर्भात दिलेला निवाडा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले कृतीशील पाऊल आहे. सामाजिक न्यायाची परिकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय निवाडा अत्यंत क्रांतिकारी आहे. सामाजिक न्यायाचा निर्णय देणारे इतर सहा न्यायमूर्ती महोदयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई हे सर्वात आघाडीवर राहिलेले आहेत. अनुसूचित जातीच्या यादीमध्ये असलेल्या सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही म्हणून देशभर ओरड सुरु आहे. काही ठराविक जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो उर्वरित इतर जाती ला...

अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन 2024

Image
परभणी-शहरात 29 डिसेंबर रोजी लोकनेते शहिद विजय वाकोडे नगरी, महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे राज्यस्तरीय अण्णाभाऊ विचार साहित्य संमेलन संपन्न झाले. शहीद सोमनाथ सुर्यवंशी विचारपीठावर संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या शुभहस्ते झाले तर संमेलनाध्यक्ष म्हणून ग्रामिण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. ग्रंथ दिंडीने वेधले शहरवासियांचे लक्षः बस स्थानकाजवळ असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयापासून सकाळी ग्रंथ दिंडी निघाली. संविधानाची प्रत, अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा, अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथा संग्ग्रह, जगतगुरू तुकोबारायांची गाथा, महात्मा फुले समग्र वाडःमय, ज्ञानेश्वरी आदि ग्रंथ संपदा फुलांनी सजविलेल्या एका पालखीत मांडून ग्रंथ दिंडी संमेलन स्थळाकडे मार्गस्थ झाली. संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे, अॅड. विजयराव गव्हाणे, अॅड. अशोक सोनी, सुप्रसिध्द कवी देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, प्रा. महेश मोरे, प्रा. राम कटारे, अमोल रणखांब, सारजाबाई भ...

अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन 2024 मीडिया कव्हरेज

Image